इतिहास
श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज

श्री अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज हे श्रीमद् नृसिंहसरस्वती स्वामी महाराजांचे अवतार मानले जातात. त्यांच्या अवताराची कथा अशी आहे. एकदा एक लाकूडतोड्या एका मुंग्यांच्या वारूळावर वार करू लागला जिथे श्रीमद्नृसिंहसरस्वती स्वामी ३०० वर्षापासून तप करीत होते. अचानक त्या लाकूडतोड्याने त्याचा कुऱ्हाडीवर रक्त पाहिले. तो ते मुंग्यांचे वारूळ स्वच्छ करू लागला आणि त्याला एक योगी तप करित असतांना दिसले. तो लाकूडतोड्या भीतीने थरथर कापू लागला. ते योगी समाधीतून बाहेर आले व लाकूडतोड्याला म्हणाले ," माझी एका विशिष्ट कामा साठी प्रगट होण्या ची वेळ आलेली आहे. ही देवांची ईच्छाआहे ”. ते योगी दुसरे कुणी नव्हते परंतु स्वताः श्री स्वामी समर्थ महाराज होते ! लाकूडतोड्याच्या कुऱ्हाडी मुळे त्यांचा मांडी वरील निशाण त्यांच्या काही जवळच्या सेवकांने पाहिले होते.
इ.स. १८५६ च्या चैत्र शुक्ल द्वितीयेच्या मंगल दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजखंडोबाच्या मंदिरा जवळ, अक्कलकोट गाव, जिल्हा सोलापूर मध्ये प्रथम पाहण्यांत आले. ह्या पूर्वी त्यांने हिमालय, चीन, तिबेट, नेपाळ तसेच पुरी, बनारस, हरिद्वार, गिरनार, काठियावाड आणि दक्षिण मधील रामेश्वरम अश्या अनेक स्थानांना भेट दिली होती. एके दिवशी एका भक्ताने त्यांना त्यांच्या कुळाची व मुळाची माहिती विचारली.त्यावर त्यांने उत्तर दिले कि ते एका वटवृक्षातून प्रकटले होते व त्यांचे नाव नृसिंह भान आहे. पुढे ते म्हणाले कि ते श्रीशैलमच्या कर्दळीवनातून आले होते आणि त्यांनी पुष्टी केली की ते स्वत: नृसिंहसरस्वतीचे अवतार होते.
श्री वामनबुआ रावजी वामोरीकर

श्री वामनबुआ रावजी वामोरीकर हे श्री स्वामी समर्थ महाराजांचे एकनिष्ठ भक्तां पैकी एक होते. हे तथ्य सिद्ध करणारी एक घटना बडोद्यामध्ये घडली. बडोद्या मध्ये असतांना वामनबुआंचे स्वास्थ्य वारंवार बिघडु लागले. ते अनेक रोगांनी ग्रस्त होते. या काळात त्यांनी स्वामींना त्यांच्या स्थिती बद्दल पत्र पाठवून संपर्क करण्याचा प्रयत्न केला, परंतु वामनबुवांना त्यांच्या कडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. वेदनांनी अत्यंत त्रस्त झाल्या मुळे वामनबुआंनी बडोदे येथील सुरसागर नावाच्या तलावात जलसमाधी घेण्याचा निर्णय केला. जेव्हा ते सुरसागर मध्ये उडी घेणार होते त्याच वेळी श्री स्वामी समर्थ महाराज स्वताः तिथे त्यांच्या समोर प्रगट झाले !! त्यांनी वामनबुआंना थप्पड मारली आणि म्हणाले ,"रे मुर्खा! प्रारब्धातल्या प्रत्येक दुःखाला तोंड देण भाग असत.सहज समाधी घेण्याच्या ऐवजी तु जलसमाधी घेत आहेस? हेच तुजं दैवी ज्ञान आहे का? असे सांगून त्यांनी वामनबुआंना सांत्वन दिलं आणि त्यांचा हात धरून त्यांचा घरी नेले. वामनबुआंचे आरोग्य जलदगतिने सुधारण्यास सुरुवात झाली असे सांगण्याची आवश्यकता नाही.
ज्या ठिकाणी स्वामी समर्थ महाराज वामनबुवां साठी साक्षात प्रगट झाले होते त्याच ठिकाणी एक नयनरम्य मठ बांधण्यात आला आहे, जे अक्कलकोट स्वामी समर्थ मठ बडोदे, म्हणुन प्रसिद्ध आहे.
मठ विषयी

शश्री वासुदेवराव (उर्फे भाऊ) कडुस्कर हे श्री स्वामी समर्थ मठा चे संस्थापक होते. ह्या मठाच्या स्थापने मागे एक खुप मोठे दैवी रहस्य आहे. श्री भाऊ ह्यांनां श्री स्वामी समर्थ महाराज स्वताः ह्या स्थळी उपस्थित आहे ह्या बाबतीची प्रचिती हवी होती. त्यांना एक दैवी संकेत मिळाला की तारकेश्वर महादेवाच्या मंदिराच्या घुमटाच्या भागावर स्वामींच्या दोन मूर्त्या आहेत. त्यांनी त्या दोन्ही मूर्त्या खाली आणल्या. परंतु एका दैवी घटनेच्या भाग स्वरूपे त्यातील एका मूर्तीस तड गेली आहे असं आढळल. तेव्हा तिथे एक पवित्र आवाज आला की, " मी स्वताः ह्या दुसऱ्या मूर्ती मध्ये उपस्थित आहे". म्हणुन जिथे स्वामी समर्थ महाराज स्वताः उपिस्थत झाले होते त्याच ठिकाणी त्या दुसऱ्या मूर्तीची स्थापनेचा निर्णय केला. ही वस्तुस्थिती श्री वासुदेवराव कडुस्कर ह्यांनी श्रीमंत गायकवाड महाराज (बडोदे) ह्यांना विस्तृतरूपाने सांगितली व मूर्तीची मागणी केली. श्रीमंत गायकवाड महाराज (बडोदे) ह्यांनी श्री वासुदेवराव कडुस्करांची स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीची मागणी मंजूर केली. १ डिसेम्बर, १९६० रोजी नारेश्वरच्या प.प. रंगावधूत महाराजां(बापजी) च्या उपस्थिती मध्ये स्वामींची मूर्तीची स्थापना जिथे श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट झाले होते तिथे झाली. वर्ष २००९-१० मध्ये मठाचा जीर्णोद्धार करण्यात आला. वडोदरा चॅरिटी कमिशनर व वडोदरा महानगर पालिकेच्या ऑफिस कडून जीर्णोद्धारा साठी सर्व आवश्यक परवानग्या प्राप्त करण्यात आल्या. बिल्डिंग प्लान चे डिझाईन बडोद्याच्या प्रसिद्ध वरिष्ठ आर्किटेक्ट श्री दत्ता एकबोटे ह्यांनी केली आहे. डेकोरेटिव्ह स्ट्रक्चरल फॉर्मेशन बडोद्याच्या प्रसिद्ध मंदिर डिझाइनर श्री गिरधर मिस्त्री अँड सन्स ह्यांनी केली आहे.
ह्या जागृत मंदिराला असंख्य संतांनी आणि मान्यवर लोकांनी भेटी दिलेल्या आहेत आणि विश्वस्त मंडळींनीं त्यांचा समयोचित आदरसत्कार केला आहे. ह्या मठात भक्तांच्या सोयी साठी सर्व नवीनतम सुविधा उदा. एयर कंडिशनर, वॉटर कूलर, म्युजिक सिस्टिम्स, CCTV केमेरा उपलब्ध केल्या आहेत.
श्री स्वामी महाराजांच्या नैवेद्या साठी मठात नवीनतम स्वयंपाकघराची सोय आहे. मठाचे सर्व आर्थिक व्यवहार अतिशय पारदर्शक आहे व ते चॅरिटी ऍक्ट आणि इनकम टॅक्स ऍक्ट अंतर्गत नियमितपणे ऑडिट करण्यात येतात.
महान सेतू जो तुम्हाला आणी आम्हाला जोडतो तो एक च आहे – सर्वशक्तिमान श्री स्वामी समर्थ महाराज”.आम्ही सर्व, ट्रस्टी ह्या नात्याने तुम्हास सर्वांना स्वामींच्या छत्रछाये मध्ये येण्यास मनःपूर्वक आवाहन करित आहोत - आपल्या सर्वांवर स्वामींच्या कृपेचा ओघ असाच अखंड राहो ही च स्वामींच्या चरणी प्रार्थना!!
श्री स्वामी समर्थ - जय गुरुदेव दत्त